सर्वात प्रथम आपण म्हणजे सर्वज्ञ हा भाव निघून गेला, या जगात आपल्या पेक्षा कितीतरी शहाणी माणस आहेत, किंबहुना ती आपल्याच अवती भवती वावरत आहेत हे दिसायला सुरुवात झाली , आणि खऱ्या अर्थाने माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली .... खूप लोकांकडून, मित्रांकडून मी खूप काही शिकत गेलो , त्यापैकी एक म्हणजे मुंबई चे मनोज कोटक ....
आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्या बरोबर गप्पा मारण्याचा योग आला तेव्हा तेव्हा मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी महत्वाचा विचार मिळाला आहे. काल त्यांच्या बरोबर कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करण्याचा योग आला , आणि पुन्हा एकदा मी एक खूप मोठी शिदोरी, एक विचार घेऊन मुंबई मध्ये पाय ठेवला. काय विचार आहे तो? या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव एक unique ability घेऊन जन्माला येत असतो. तो जो गुण आहे तो इतर कोणाकडे नसतो, फक्त आपलं काम एवढच आहे, स्वतामधला तो गुण शोधण्याच , आणि त्याचं बरोबर समोरच्या व्यक्ती मध्ये सुद्धा असा काही गुण आहे हे ध्यानात ठेऊन त्याला कमी न लेखण्याच.
एखाद्या माणसाला समजा शिस्त नसेल, त्याच्या वस्तू इतस्ततः पसरलेल्या असतील, पण त्याच्या कडे एखादा विषय दुसऱ्याला समजून सांगण्याची उत्तम क्षमता असेल तर आपण त्या क्षमते कडे पहिले पाहिजे , आणि त्याचा आदर केला पाहिजे ना कि त्याच्या बेशिस्तपणा बद्दल त्याला शिव्या घालाव्यात.
या विषयाला खूप कंगोरे आहेत, मी माझ्या दृष्टिन महत्वाचा असा एकच मुद्दा मी इथे मांडायचा प्रयत्न केलाय..... पण कसं आहे, लिखाण हि काही माझी unique ability नाही, त्यामुळे काय लिहिलं आहे ते तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे .....
nice
ReplyDelete