Tuesday, August 2, 2011

आठवणींचे ढग

आज मुंबई मधून नाशिक ला येण्यासाठी दुपारच्या जनशताब्दी एक्स्प्रेस ने मी निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडीला जास्त गर्दी नव्हती ,त्यात मी आरक्षण केलेलं असल्यामुळे तसा निवांतच होतो. गाडी दादर ला आली , मी मस्त पैकी जागेवर जाऊन बसलो. शेजारी कोणीही नव्हत, आणि पुढे येणार हि नव्हत , त्यामुळे गप्पा होणार नव्हत्या. हातात पु.ल. एक साठवण होत , आणि मोबाईल मध्ये 'सहेला रे' होत. सगळ कसं जुळून आलं होत. बाहेर पाऊस पडतोय, मध्येच जोर वाढून मधेच कमी होत होता....आजूबाजूला हिरवळ होती, चक्क मुंबई मध्ये सुद्धा....
गाडीन ठाणे सोडलं आणि मग मी पुस्तक उघडल ....अंतू बरवा वाचत होतो...ते संपता संपता कसारा जवळ आलं, समोर डोंगरावर ढग दिसायला लागले. अंतू बरवा वाचून संपला होता, पान पालटलं तर समोर नंदा प्रधान. ... गम्मत कशी असते, हि सगळी माणस त्या त्या नावान जरी नसली तरी अन्य काही नावानं आपल्या आयुष्यात येऊन गेलेली असतात.... आणि नंदा समोर आल्यावर मन झप्पकन भूतकाळात पाठीमागे जाऊ लागलं. भेटलेले लोक, त्यांच्याशी विणलेले धागे, जुळलेले सूर , सगळ्या आठवणी ताज्या होऊन समोर येऊ लागल्या. गाडी घाटात वर गेलेली होती, आणि मगाशी डोंगरावर असलेले ढग आता गाडीच्या जवळून जात होते , आणि गाडीत आतमध्ये हे आठवणींचे ढग एकामागून एक येत होते.
काही वेळेला आशा आठवणी मनाला व्याकूळ करून जातात, थोडा त्रास देतात, ज्यांना मनाच उन्मन करायचं आहे, त्यांच्या साठी आठवणींच आशा प्रकारे त्रास देण योग्य नाही. पण जर आपण या आठवणींकडे रसिकतेन पहावं. मात्र त्यातच गुंतून पडू नये; अन्यथा आपली अध्यात्मिक प्रगती थांबेल. ' आपली जीवन कमलाप्रमाणे असाव' असा म्हणल जात.कमाल पाण्यात-चिखलात उगवत, त्यातच त्याचं पोषण होत. पण तरीही ते त्यान लिप्त होत नाही. माणसान संसारात या प्रमाणे असाव.
आठवणी आणि स्वप्नांचे ढग हे कायम आपल्यासोबत असणारच, त्यांची उपेक्षा न करता आणि आसक्ती न ठेवता सर्व गोष्टींचा समतोल साधून आपली नौका पैलतीरी न्यावी.

No comments:

Post a Comment