Thursday, August 4, 2011

Grand आजी !!!!!!!!!

मी खूप लहान असतानाचा प्रसंग आठवायचा प्रयत्न केला तर मला आजी सोबत असलेलाच प्रसंग आठवतो. तसा मी कळायला लागल्यापासून मला आजीचाच लळा जास्त. तसं माझ्यावर सगळे खूप प्रेम करायचे, आई, बाबा, मामा, काका, काकू, इतर लहान मोठी भावंड, पण मला आजी जास्त आवडायची. त्याला २ कारण असू शकतील, एक तर मी लहान असल्यापासून तिच्या जवळच असायचो , आणि मला लहान असताना गोरी आणि नीट नेटकी राहणारी माणस जास्त आवडायची, त्यामुळे पण असेल. पण आत्ता मला जाणवतंय, माझ विश्व आजीभोवती विणल गेलं होत.
तसं आजीच मी दुसर नातवंड. आणि आता एकुणात आम्ही तिची ५ नातवंड, पण मला असा वाटत कि तिचा माझ्या वर जरा जास्त जीव, म्हणजे तीन कधी आमच्यात भेदभाव केला नाही, तरी पण मला असं वाटत.
मला कळतंय तेव्हा पसून मी बघतोय, ते आत्ता पर्यंत, बघेल तेव्हा ती कामात असते.आपल्या कामातून वेळ काढून ती घराचा आणि स्वतःचा व्यवस्थितपणा जपत असते, आणि आता तिला सुना आल्यात , पण पूर्वी जेव्हा ती अख्या घरात एकटी बाई होती, बाकी सगळे टोणगे, तेव्हा सुद्धा ती सगळ आवरून, प्रेस मध्ये काम करू लागत असे, आणि या सगळ्यातच तीन , म्हणजे आजी - आजोबा दोघांनीही असंख्य माणस जोडली. जोडली म्हणजे इतकी कि आजतागायत हि सगळी माणस आजी-आजोबांचं नाव काढलं कि गदगदून जातात.
आजीला सगळी जण ताई म्हणतात, आणि आजोबा आणि तिच्या पेक्षा मोठे लोक तिला सुमे ( तसं तीच नाव सुमन आहे) म्हणत असत, म्हणून आम्ही नातवंड तिला सुमी आजी म्हणतो. मला पहिला प्रसंग आठवतोय, मी बहुतेक बालवाडी मध्ये असेन तेव्हा, जानेवारी महिना असणार, आमच्या पाध्येवाड्यातल्या माजघरात आम्ही झोपायचो, पाहते मला जाग आली आणि शेजारी आजी नव्हती, तर मी उठून स्वयंपाक घरात गेलो, तिथे आजी एका कोपऱ्यात स्टोव्ह वर हलवा करत बसली होती. अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी, शांत चेहरा, मंद आचेवर हलवा फुलत होता. मी गेल्यावर आजीन मला पटकन मांडीवर घेतलं. आणि मग थोड्या वेलन हलवा बरणीत भरून ठेवला, आणि माझं तोंड धुवून दुध प्यायला दिलं.
त्यानंतर ची आठवण म्हणजे, तिचं एक मोठ ऑपरेशन झालं होत.मी तेव्हा ६ वर्षांचा होतो. आणि ऑपरेशन आहे म्हणून मला आजोळी ठेवलं होत. २ दिवसानंतर मला आजीला बघायला नेल होत, तेव्हा तिच्या नका तोंडात नळ्या आणि सलाईन बघून मी खूप रडलो होतो, मला अजूनही आठवतोय तो प्रसंग. माझ्या प्रत्येक आजारपणात अजून हि मला तीच लागते. अजूनहि जेवताना तिच्या हाताची आमटी, पुरणपोळी, गुळपोळी यांची चव इतर कशाला नाही असं वाटत. जरी माझी आई हे सगळे पदार्थ खूप सुंदर करत असली तरी सुद्धा. आम्हाला सगळ्यांनाच ती कोणत्याही कारणाशिवाय आवडते.
तसं बघायला गेलं तर ती देवा धर्माचं,सण-वार,परंपरा सगळ एकदम व्यवस्थित करणार. म्हणजे अगदी साग्रसंगीत. पण दुसरी कडे कोक, आईस्क्रीम यासागाल्यावर भारी प्रेम. पत्ते, सिनेमे, मैत्रिणी या विश्वात पण ती रमती. १० वर्षांपूर्वी, म्हणजे तिच्या वयाच्या ६५ नंतर, तिने माझ्या सोबत मुंबई पुणे प्रवास रेल्वे च्या दारात बसून केला होता. तिचे एकेक किस्से आठवायला लागलो कि मीच आवक होऊन जातो.
लहान असताना घरात काही विशेष पदार्थ केला कि एका डब्यात घालून मला ती चंदी कड पाठवायची. हि चंदी म्हणजे आजीची मामे बहिण. तीच नाव चंद्रकला. ती मी लहान असताना मला कडेवर घेऊन मारुतीला न्यायाची आणि तिथे खडीसाखर द्यायची, म्हणून मी तिला खडीसाखरेची आजी म्हणायचो. घरात काहीही केल कि एक डबा या आजी कड, आणि हि आजी पण फणस, खवा, घरच दुध असं काही बाही पाठवत रहायची. खर तर त्यावेळी या देण्या घेण्याचा खूप कंटाळा यायचा, कारण नाचकाम आम्हाला करायला लागायचं. पण आज चंद्रकला मावशी नसली तरी अजीबद्दलच प्रेम पुढच्या पिढीत पण तसच राहील आहे.
ती जशी आजी म्हणून आम्हा सगळ्यांची लाडकी आहे तशीच ती ज्यांची मामी, आत्या, आई, सासू, मावशी, मैत्रीण, बहिण, पणजी आहे, त्यांची पण ती तितकीच लाडकी आहे. हि सगळी रक्ताची नाती झाली, पण इतर जोडलेली माणस पण तिच्यावर जीवापाड प्रेम करतात, आणि याच एकाच कारण म्हणजे तीन सगळ्यांवर अगदी जीवापाड प्रेम केल, अगदी कोणत्याही कारण शिवाय. तीन सर्वांशी जे काही बंध निर्माण केले आहेत , ते खरच अतूट आहेत.

Wednesday, August 3, 2011

ओळख पटली ज्यास स्वतःची........

आज दहावीच्या result वर विद्यार्थ्याची पुढची दिशा ठरवली जाते. त्यामध्ये पलाकांसोबत तय विद्यार्थ्याचाही तेवढाच सहभाग असतो. लहान असल्यापासून आपल्यावर नकळत फ़क्त पैसे मिळवायचे संस्कार होतात. आणि त्याची परिणीती १० वी ला पुष्कळ मार्क मिळवून सायन्स ला प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनियर होणे या उद्देशात होते. आजकाल या दोन शाखांमध्ये सुद्धा वैविध्य आलंय, तरी पण कोणीही वेगळा, किंबहुना आपल्या आवडीचा मार्ग चोखाळताना दिसत नाही. असा का आहे? लोक आजकाल भौतिक सुखाच्या माग का लागलेत? या प्रश्नांची उत्तर शोधण तसं अवघडच आहे म्हणा, पण आपण स्वतः सुद्धा थोडा विचार केला, आपल्या स्वतःच्या बद्दल तर आपण करतोय ते काम आपल्या आवडीच आहे का?
एक गोष्ट आपण मान्य करू, कि पैसे मिळवण्यासाठी सर्वांनाच आवडीच काम करायला मिळत असं नाही, परंतु पैसे मिळवण्यासाठी काम करत असताना , स्वतःच्या आवडीच काम दिवसात थोडा वेळ तरी करायला मिळत का? ...या प्रश्नाचं उत्तर ९०% लोकांकडून नाही असाच येईल.... काय कारण आहे बर याच?
मला वाटतंय आपण आपल्या आत मध्ये डोकावून पाहतच नाही आहोत. आपली unique ability काय आहे याची जाणीव आपण करूनच घेत नाही आहोत. कारण एकदा का आपल्याला आपल्या आवडीच काम
कोणत आहे ते समजल कि आपण ते आपोआप मन लाऊन करायला लागतो. त्या कामाबद्दलचे विविध कंगोरे आपल्याला स्पष्ट होऊ लागतात, आणि मग आपण आपल्या मनाने त्याला जास्त वेळ देऊ लागतो. ते काम आपण पैसे कामावाचे म्हणून नव्हे तर आपल्या समाधानासाठी करत राहतो, पैसे हा त्या कामा मधला एक bi product असतो. पण आपण स्वतःच्या मनाला अंतर्मुख होण्याची संधीच नाही देत आहोत. जर दिवसातला काही काल आपण स्वतःसाठी दिला तर मला वाटत आपण स्वतःला स्वतःबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकू.
आजकाल लोक डिप्रेशन मध्ये जातात याच कारण स्वतःबद्दल च अज्ञान. आणि मला वाटतंय जर आपल्याला आपण काय आहोत, कोण आहोत हे समजल तर आपल्या जन्माचं सार्थक होईल. ज्ञानेश्वर माउली सुद्धा म्हणतात ' अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले '
नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे लिहितात,

सागर पोहत बाहूबलाने; नाव त्यास मिळो मिळो रे|
स्वयेच जो तेजोनिधी तरणी; तदगृही दीप जळो न जळो रे|
जो करी कर्म अहेतू ,निरंतर; वेड त्यास मिळो न मिळो रे |
ओळख पटली ज्यास स्वतःची; देव त्यास कळो न कळो रे||

मनाला अंतर्मुख होण्याची सवय लागली कि हळू हळू सर्व प्रश्न सुटत जातील, आपली जाणीव पक्की होऊ लागते कि आपल्याला काय करायचं आहे. किंबहुना आपल्याला काय करायचं नाही हे जरी पक्का झाल तरी आपला बराचसा मार्ग सुकर होऊन जाईल.
मी स्वतःवरून सांगतो; ते बरोबर आहे कि चूक ते मला नाही माहित; पण ' काय करायचं ते मला समजल नसेल कदाचित, पण जे करायचं नाही ते नाकारण्याच धाडस मी दाखवलय'....

Tuesday, August 2, 2011

आठवणींचे ढग

आज मुंबई मधून नाशिक ला येण्यासाठी दुपारच्या जनशताब्दी एक्स्प्रेस ने मी निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडीला जास्त गर्दी नव्हती ,त्यात मी आरक्षण केलेलं असल्यामुळे तसा निवांतच होतो. गाडी दादर ला आली , मी मस्त पैकी जागेवर जाऊन बसलो. शेजारी कोणीही नव्हत, आणि पुढे येणार हि नव्हत , त्यामुळे गप्पा होणार नव्हत्या. हातात पु.ल. एक साठवण होत , आणि मोबाईल मध्ये 'सहेला रे' होत. सगळ कसं जुळून आलं होत. बाहेर पाऊस पडतोय, मध्येच जोर वाढून मधेच कमी होत होता....आजूबाजूला हिरवळ होती, चक्क मुंबई मध्ये सुद्धा....
गाडीन ठाणे सोडलं आणि मग मी पुस्तक उघडल ....अंतू बरवा वाचत होतो...ते संपता संपता कसारा जवळ आलं, समोर डोंगरावर ढग दिसायला लागले. अंतू बरवा वाचून संपला होता, पान पालटलं तर समोर नंदा प्रधान. ... गम्मत कशी असते, हि सगळी माणस त्या त्या नावान जरी नसली तरी अन्य काही नावानं आपल्या आयुष्यात येऊन गेलेली असतात.... आणि नंदा समोर आल्यावर मन झप्पकन भूतकाळात पाठीमागे जाऊ लागलं. भेटलेले लोक, त्यांच्याशी विणलेले धागे, जुळलेले सूर , सगळ्या आठवणी ताज्या होऊन समोर येऊ लागल्या. गाडी घाटात वर गेलेली होती, आणि मगाशी डोंगरावर असलेले ढग आता गाडीच्या जवळून जात होते , आणि गाडीत आतमध्ये हे आठवणींचे ढग एकामागून एक येत होते.
काही वेळेला आशा आठवणी मनाला व्याकूळ करून जातात, थोडा त्रास देतात, ज्यांना मनाच उन्मन करायचं आहे, त्यांच्या साठी आठवणींच आशा प्रकारे त्रास देण योग्य नाही. पण जर आपण या आठवणींकडे रसिकतेन पहावं. मात्र त्यातच गुंतून पडू नये; अन्यथा आपली अध्यात्मिक प्रगती थांबेल. ' आपली जीवन कमलाप्रमाणे असाव' असा म्हणल जात.कमाल पाण्यात-चिखलात उगवत, त्यातच त्याचं पोषण होत. पण तरीही ते त्यान लिप्त होत नाही. माणसान संसारात या प्रमाणे असाव.
आठवणी आणि स्वप्नांचे ढग हे कायम आपल्यासोबत असणारच, त्यांची उपेक्षा न करता आणि आसक्ती न ठेवता सर्व गोष्टींचा समतोल साधून आपली नौका पैलतीरी न्यावी.