Wednesday, August 3, 2011

ओळख पटली ज्यास स्वतःची........

आज दहावीच्या result वर विद्यार्थ्याची पुढची दिशा ठरवली जाते. त्यामध्ये पलाकांसोबत तय विद्यार्थ्याचाही तेवढाच सहभाग असतो. लहान असल्यापासून आपल्यावर नकळत फ़क्त पैसे मिळवायचे संस्कार होतात. आणि त्याची परिणीती १० वी ला पुष्कळ मार्क मिळवून सायन्स ला प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनियर होणे या उद्देशात होते. आजकाल या दोन शाखांमध्ये सुद्धा वैविध्य आलंय, तरी पण कोणीही वेगळा, किंबहुना आपल्या आवडीचा मार्ग चोखाळताना दिसत नाही. असा का आहे? लोक आजकाल भौतिक सुखाच्या माग का लागलेत? या प्रश्नांची उत्तर शोधण तसं अवघडच आहे म्हणा, पण आपण स्वतः सुद्धा थोडा विचार केला, आपल्या स्वतःच्या बद्दल तर आपण करतोय ते काम आपल्या आवडीच आहे का?
एक गोष्ट आपण मान्य करू, कि पैसे मिळवण्यासाठी सर्वांनाच आवडीच काम करायला मिळत असं नाही, परंतु पैसे मिळवण्यासाठी काम करत असताना , स्वतःच्या आवडीच काम दिवसात थोडा वेळ तरी करायला मिळत का? ...या प्रश्नाचं उत्तर ९०% लोकांकडून नाही असाच येईल.... काय कारण आहे बर याच?
मला वाटतंय आपण आपल्या आत मध्ये डोकावून पाहतच नाही आहोत. आपली unique ability काय आहे याची जाणीव आपण करूनच घेत नाही आहोत. कारण एकदा का आपल्याला आपल्या आवडीच काम
कोणत आहे ते समजल कि आपण ते आपोआप मन लाऊन करायला लागतो. त्या कामाबद्दलचे विविध कंगोरे आपल्याला स्पष्ट होऊ लागतात, आणि मग आपण आपल्या मनाने त्याला जास्त वेळ देऊ लागतो. ते काम आपण पैसे कामावाचे म्हणून नव्हे तर आपल्या समाधानासाठी करत राहतो, पैसे हा त्या कामा मधला एक bi product असतो. पण आपण स्वतःच्या मनाला अंतर्मुख होण्याची संधीच नाही देत आहोत. जर दिवसातला काही काल आपण स्वतःसाठी दिला तर मला वाटत आपण स्वतःला स्वतःबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकू.
आजकाल लोक डिप्रेशन मध्ये जातात याच कारण स्वतःबद्दल च अज्ञान. आणि मला वाटतंय जर आपल्याला आपण काय आहोत, कोण आहोत हे समजल तर आपल्या जन्माचं सार्थक होईल. ज्ञानेश्वर माउली सुद्धा म्हणतात ' अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ध्यान कळो आले '
नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे लिहितात,

सागर पोहत बाहूबलाने; नाव त्यास मिळो मिळो रे|
स्वयेच जो तेजोनिधी तरणी; तदगृही दीप जळो न जळो रे|
जो करी कर्म अहेतू ,निरंतर; वेड त्यास मिळो न मिळो रे |
ओळख पटली ज्यास स्वतःची; देव त्यास कळो न कळो रे||

मनाला अंतर्मुख होण्याची सवय लागली कि हळू हळू सर्व प्रश्न सुटत जातील, आपली जाणीव पक्की होऊ लागते कि आपल्याला काय करायचं आहे. किंबहुना आपल्याला काय करायचं नाही हे जरी पक्का झाल तरी आपला बराचसा मार्ग सुकर होऊन जाईल.
मी स्वतःवरून सांगतो; ते बरोबर आहे कि चूक ते मला नाही माहित; पण ' काय करायचं ते मला समजल नसेल कदाचित, पण जे करायचं नाही ते नाकारण्याच धाडस मी दाखवलय'....

No comments:

Post a Comment